
नारळाच्या रसातिल शेवया खायला अतिशय मस्त लागतात। ज्याना नारळाचे दूध किंवा रस चालत नसेल त्यानी त्या साध्या दुधात गुळ घालून खाल्ल्या तरी चालेल. त्या दुधात वेलची किंवा जायफळाची पूड घातली तर चांगली चव येइल.
साहित्य
त्तांदळाचे पीठ -१ वाटी
पाणी- पाउण वाटी
तेल-१ चमचा
मीठ चवीनुसार
नारळ -१
कृति
प्रथम एक भांड्यात ३/४ वाटी पाणी उकळावे। उकळवताना त्यात चमचाभर तेल आणि चिमुटभर मीठ घालावे.
गैस मंद करूँ त्यात त्तांदळाचे पीठ घालावे। ढवळून झाकण ठेवावे आणि गैस बंद करावा.(मोदकाप्रमाणे उकड काढावी) .५ मिनिटांनी पीठ परातीत काढून मळून घ्यावे। त्याचे मुठीने मुटके करावेत। एक भांड्यात ३-४ कप पाणी उकळावे आणि त्यात हे मुटके सोडावेत। सोडल्यावर ते तळाला जातील पण शिजल्यावर हलके होऊन वरती येतील मग गैस बंद करावा.
चकलीच्या साच्यामधे शेवेची जाळी घालून शेवया पाडाव्यात।
१ नारळ खोवून खोबर्याचा रस काढावा त्यात चवीप्रमाणे गूळ घालावा। हवे असल्यास वेलची पूड किंवा जायफळाची पूड घालावी.नीट विरघळला पाहिजे. त्यात या शेवया सोडाव्या आणि खाव्या.
No comments:
Post a Comment